नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांमुळे ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान उभारण्यात आलेली नवीन जलवाहिनी अंतिम टप्प्यात असून, १५ एप्रिलपासून शहराला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा कमी होण्याची अपेक्षा आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी विविध तालुक्यांतून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
समशृंगगडावरील आद्य स्वयंभू शक्तिपीठात होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून २६ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट जाणवत असून, Heat Stroke चा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू केल्या असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.