नाशिक शहरात २२ व २३ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा ‘सूर्यकिरण’ एअर शो आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नांदुरी ते सप्तशृंगी गड या घाटमार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने दोन्ही दिशांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे.
नाशिक महापालिकेने निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडिया, ई-मेल व फोनद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर चार नवीन घाट बांधले जाणार असून यासाठी २६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे झालेल्या नैसर्गिक शेती संवाद कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहर भक्ती, पर्यटन आणि उत्सवाच्या वातावरणात रंगले. मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या तर पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली.
नाशिक महानगरपालिकेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री यांनी आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश दिले.
नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन आंदोलनाला २७ दिवस पूर्ण झाले असतानाही सोमवारी आंदोलनस्थळी अनपेक्षित शांतता दिसून आली. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर अचानक कमी उपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.