गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान उभारण्यात आलेली नवीन जलवाहिनी अंतिम टप्प्यात असून, १५ एप्रिलपासून शहराला अधिक क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा कमी होण्याची अपेक्षा आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी विविध तालुक्यांतून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट जाणवत असून, Heat Stroke चा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू केल्या असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान रस्ते, पाइपलाइन आणि केबल टाकण्याच्या कामांमुळे नागरिकांना दररोज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत आहे.
नाशिकमध्ये 2026–2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने संचार व दळणवळण व्यवस्थेवर विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित केले. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ. संजय तरडे यांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला.