नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला.