राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्या दिवशी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने १३ प्रकारची ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. मतदारांनी योग्य ओळखपत्रासह मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. शहरात १,५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार असून ती पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त असतील.
नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून २३ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर धरण परिसरात भव्य एअर शो होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने सखोल नियोजनाचे आदेश दिले आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नाशिक महापालिकेने निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडिया, ई-मेल व फोनद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘वोटकर नाशिककर’ ही जनजागृती मोहीम राबवली जात असून मनपा प्रशासन व पोलिसांकडून नागरिकांना निर्भय व पारदर्शक वातावरणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने २३ जानेवारी रोजी गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण ऍरोबॅटिक टीमचा भव्य एअर शो होणार असून सुमारे ३३ हजार नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर पोलिस विभागाच्या १७ महत्त्वाच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्याची गरज न राहता घरबसल्या अर्ज व मंजुरी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.