नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. शहरात १,५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार असून ती पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त असतील.
मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नाशिक महापालिकेने निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडिया, ई-मेल व फोनद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘वोटकर नाशिककर’ ही जनजागृती मोहीम राबवली जात असून मनपा प्रशासन व पोलिसांकडून नागरिकांना निर्भय व पारदर्शक वातावरणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर चार नवीन घाट बांधले जाणार असून यासाठी २६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे झालेल्या नैसर्गिक शेती संवाद कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहर भक्ती, पर्यटन आणि उत्सवाच्या वातावरणात रंगले. मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या तर पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली.
नववर्ष २०२६ नाशिककरांसाठी नव्या संधी, विकास आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. शहराचा सर्वांगीण विकास, स्थानिक व्यवसायांना चालना आणि नागरिकांची जबाबदारी यांवर आधारित हा लेख नव्या वर्षाकडे आशेने पाहतो.
नववर्ष, नाताळ सुट्ट्या आणि शाकंबरी नवरात्रोत्सवामुळे वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावरील देवी मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.