मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने १३ प्रकारची ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. मतदारांनी योग्य ओळखपत्रासह मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेने निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडिया, ई-मेल व फोनद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक महानगरपालिकेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री यांनी आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश दिले.