राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना नाशिकमधील टंचाईचे संकट गडद
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना, नाशिक जिल्ह्यातील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. २०१९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरने ३९८ चा आकडा गाठला आहे. तब्बल सात लाख १६ हजार ५०१ लोकसंख्येची तहान टँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे. यंदा देशात मान्सूनने वेळेआधीच आगमन केले असून, महाराष्ट्राच्या काही भागातही त्याने वर्दी दिली आहे. पण …