मान्सूनची पाठ : जलसंकट अधिक गडद; गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – १५ जून सरल्यानंतरही मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील जलस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील प्रमुख चोवीस धरणांपैकी निम्मी धरणे कोरडीठाक पडली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे जलसंकट अधिक गडद बनले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा शिल्लक आहे. देशात यंदा वेळेआधी मान्सूनने वर्दी दिली. …